येस न्युज मराठी नेटवर्क । कोरोनाचे रुग्ण कमी होण्यासाठी देशामध्ये रविवारी 11 एप्रिल पासून चार दिवसांचा कोविड लसीकरण उत्सव सुरू करण्यात आला आहे. देशात शनिवारी रात्री पर्यंत आलेल्या अहवालानुसार 24 तासात दीड लाख नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत .एकाच दिवसात रुग्ण वाढीचा वेग भारतामध्ये अमेरिके पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचा आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरण उत्सव सुरू होत असताना देशवासीयांना चार प्रकारचा आग्रह धरण्याची विनंती केली आहे.
रोग प्रतिबंधक लस टोचून घ्या मास्क वापरा व इतरांना मास्क वापरण्यासाठी प्रोत्साहन द्या covid-19 ट्रीटमेंट मध्ये सहकार्य करा त्याचप्रमाणे एखादा covid-19 पॉझिटिव्ह आढळल्यास मायक्रो कंटेनमेंट झोन तयार करण्यास मदत करा अशी विनंती मोदी यांनी केली आहे. एकही लस वाया न घालवता 11 ते 14 एप्रिल पर्यंत उत्सव साजरा करता येईल का; असे आवाहन मोदी यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत व्यक्त केले होते. भारताने आतापर्यंत 10 कोटी 12 लाख 84 हजार 282 व्यक्तींना लस दिली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले आहे . हा टप्पा भारताने 85 दिवसात घातला आहे.