येस न्युज मराठी नेटवर्क । महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली असून मंत्रिमंडळ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाला आहे. या बैठकीत लॉकडाउनसंदर्भातील निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. लॉकडाउन करायचा की कडक निर्बंध लावायचे यावर चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
राज्यात करोनाचा मोठ्या प्रमाणात उपद्रव झाला आहे. देशात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, दिल्ली, अहमदनगर आणि नांदेड या नऊ जिल्ह्यांचा समावेश आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील स्थितीही चिंताजनक असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांनी नियमांचं पालन न केल्यास लॉकडाउन लावू असा इशारा दिला होता. दोन दिवसात निर्णय घेऊ असं ठाकरे म्हणाले होते.