• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 28, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन

by Yes News Marathi
April 1, 2021
in मुख्य बातमी
0
रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन केल्याची माहिती समोर आली आहे. रश्मी ठाकरे या सध्या कोरोना झाल्यामुळे मुंबईच्या एच.एन. रिलायन्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून रश्मी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

रश्मी ठाकरे यांना 23 मार्च रोजी कोरोनाची लागण झाली होती. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरच त्यांनी स्वत: क्वारंटाईन करुन घेतलं होतं. त्यानंतर रश्मी ठाकरे यांना दोन दिवसांपूर्वी HN रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. महत्वाची बाब म्हणजे 11 मार्च रोजी रश्मी ठाकरे यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रश्मी ठाकरे यांना केलेल्या फोनमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने एनडीएला सोडचिठ्ठी देत भाजपशी फारकत घेतली होती. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड वितुष्ट आले होते. राज्यातील भाजप नेते ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीत. सचिन वाझे आणि परमबीर सिंह लेटरबॉम्बवरुन हा वाद आणखी विकोपाला गेला होता. भाजप नेत्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाषा केली होती. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट उद्धव ठाकरे यांना फोन करणे अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का आहे.

Previous Post

प्रियदर्शनी तर्फे स्टीमर व ब्लिचिंग पावडर वाटपाचे अनावरण

Next Post

पश्चिम बंगालची निवडणूक देशाचं भविष्य ठरवेल : संजय राऊत

Next Post
पश्चिम बंगालची निवडणूक देशाचं भविष्य ठरवेल : संजय राऊत

पश्चिम बंगालची निवडणूक देशाचं भविष्य ठरवेल : संजय राऊत

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group