मुंबई : मनसुख हिरेन प्रकरणी सचिन वाझे याचे नाव आल्यानंतर सभागृहात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वाझे याच्या राजीनाम्याची मागणी करून तात्काळ त्याला अटक करण्याची मागणी केली होती. याच मुद्द्यावरून आज पत्रकार परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांनी विरोधकांच्या मागणीवर जोरदार टीका केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
एकाला बेड्या टाकून आरोपी किंवा संशयित म्हणून घेऊन गेले म्हणून सचिन वाझेंना लटकवताय का? असा सवालच मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना विचारला होता. यावेळी त्यांनी आर. रिपब्लिकचे मुख्यसंपादकअर्णव गोस्वामी यांचे नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी टोला लगावला होता.
सचिन वाझे पूर्वी शिवसेनेत होते. २००८ ला होते. त्यानंतर त्यांनी सदस्यत्व रिन्यू केलेलं नाही. त्यांचा शिवसेनेशी संबंध नाही. हिरेन प्रकरण लावून धरलं, ते धरायलाच हवे. मात्र डेलकर प्रकरणात तर भाजपाचा मंत्री आहे. सचिन वाझे तर मंत्री नाही. पक्षपातीपणे का बघताय? सचिन वाझेला का लटकवताय? एकाला बेड्या टाकून आरोपी किंवा संशयित म्हणून घेऊन गेले म्हणून?”, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी अर्णव गोस्वामींचे नाव न घेता फडवीसांवर टीका केली होती.