मुंबई : मोदी सरकारकडून मांडल्या जाणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात गरीब आणि मध्यमवर्गीयांना दिलासा देणारी घोषणा झाली पाहिजे. गरीब आणखी गरीब होता कामा नये, अशी अपेक्षा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.
यावेळी त्यांनी वस्तू व सेवा कर कायद्याच्या (GST) परताव्याच्या पैशांवरून केंद्र सरकारला टोला लगावला. केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या वाट्याचे जीएसटीचे पैसे लवकरात लवकर द्यावेत. म्हणजे आम्हाला कोरोनाच्या संकटातून अर्थव्यवस्था बाहेर काढता येईल. तसेच कोरोनाची लस मोफत देण्यासंदर्भातही विचार झाला पाहिजे, असे संजय राऊत यांनी सांगितले.