सोलापूर,अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील पाणीसाठा यंदाच्या वर्षी 121 टीएमसी एवढे पाणी साठवण्यात आले होते. सध्या शेतीसाठी कॅनॉल मधून तसेच पिण्यासाठी भीमा नदीतून पाणी सोडणे सुरू असल्यामुळे दररोज दोन टक्के एवढा पाणीसाठा कमी होत आहे. आज सकाळी सहाच्या आकडेवारीनुसार उजनी धरणाची पाणी पातळी मायनस मध्ये गेली असून धरणात सध्या 63 टीएमसी एवढा पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी आजच्याच दिवशी उजनी धरण मायनस 18% एवढ्या खालच्या पातळीवर गेले होते तर धरणात 53 टीएमसी एवढा पाणीसाठा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा टक्के पाणीसाठा जास्त आहे. सध्या उजनीतून भीमा नदीत 6000 क्युसेक तर कॅनॉल मधून 2860 क्युसेक पाणी सोडले जात आहे. उजनीतील जिवंत पाणीसाठा संपला आणि उजनी मृत साठ्यामध्ये म्हणजेच मायनस गेली असली तरीही हा पाणीसाठा देखील वापरता येतो. मायनस 40% पर्यंत उजनी ची पातळी गेली तरीही सोलापूर शहराला नवीन जलवाहिनीतून पाणी घेता येणार आहे. डिसेंबर महिन्यात सुमारे सव्वा चारशे चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेले उजनीचे हे पाणी पातळी कमी झाल्यामुळे सध्या 196 चौरस किलोमीटरवर आले आहे.पाणीपावसाळा लांबला तर सोलापूरकरांची चिंता वाढेल त्यामुळे आता पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

