पावसाचा जोर कमी झाला असला, तरी इंद्रायणी नदीला आलेल्या महापुरामुळे आळंदीतील चारही पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. वारकऱ्यांच्या सुरक्षितेला प्राधान्य देत श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने बुधवारी (८ जुलै) होणारा पालखी प्रस्थान सोहळा अत्यंत मर्यादित उपस्थितीत पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे. इंद्रायणी नदीने धोकादायक पातळी ओलांडल्याने शहरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, इंद्रायणी पुलावरील कठडे व वीजखांब पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत.
वाहतूक नियोजनासाठी 4 अतिरिक्त पोलीस आयुक्त , 13 उपायुक्त , 30 सहाय्यक आयुक्त , 182 पोलीस निरीक्षक, 570 सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक आणि 6552 पोलीस अंमलदारांची नियुक्ती केली आहे .तसेच पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड मधील पोलीस अधिकाऱ्यांशी समन्वय साधून वाहतुकीचे नियोजन केले आहे, अशी माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त डॉक्टर संदीप भाजीभाकरे यांनी दिली.पालखी सोहळ्याला वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुणे शहर वाहतूक शाखेने गूगल फॉर्म द्वारे केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत 1428 नागरिकांनी स्वयंसेवक म्हणून नोंदणी केली.











