मुंबई : मंत्रालयात आज संध्याकाळी ५ वाजता मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले असून ठाकरे सरकारची आज अखेरची बैठक ठरण्याची शक्यता आहे. न्यायालयात लढाई सुरू असताना महाराष्ट्र विधानमंडळात कायदेशीर प्रक्रिया सुरु झाली असून सर्व आमदारांना उद्या 30 जून रोजी विधिमंडळात उपस्थित राहण्याचे पत्र पाठवण्यात आले आहे.