येस न्युज मराठी नेटवर्क : देशात कोरोनाचं संकट घोंगावत असताना लशींचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे. देशातील करोना लशी इतर देशांना का दिल्या याबाबत सोशल मीडियावर रान उठवलं आहे. त्यातच सीरम इंस्टीट्यूटचे कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी सोशल मीडियावर पत्रक पोस्ट केलं आहे. भारतीयांच्या वाट्यातील लशी निर्यात केल्या नाहीत असं स्पष्टीकरण अदर पूनावाला यांनी दिलं आहे. तसेच २-३ महिन्यात संपूर्ण देशाचं लसीकरण शक्य नसल्याचं पत्रकाद्वारे सांगितलं आहे.
जगातील करोनारुपी संकट मोठं आहे. त्यामुळे हे संकट रोखण्यासाठी लस खूप मोठं हत्यार आहे. मात्र लस निर्मिती करताना अनेक अडचणींचाही सामना करावा लागत आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचं लसीकरण होण्यासाठी २ ते ३ वर्षे लागतील असं त्यात नमूद केले आहेत.