सोलापूर जिल्ह्यात सध्या भीमा नदी काठाला शेतीपंपाचा पंपाला वीज पुरवठा फक्त दोन तास केला आहे आणि इतर शेतीपंपासाठी सहा तास वीज पुरवठा केलेला आहे खरं तर उन्हाळ्यात शेतकऱ्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली पिके आत्ता पावसाळ्याच्या तोंडावर वीजे अभाई करपू लागलेली आहेत आपण जो भीमा नदी काठच्या शेतकऱ्यांना दोन तास वीजपुरवठा करण्याचा आदेश काढलेला आहे तो तात्काळ रद्द करून भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना किमान आठ तास वीजपुरवठा करावा यासह सोलापूर जिल्ह्यातील विहीर बोरवेल शेततळे व शेतीसाठी असणारे सर्वच कृषी पंपाचा वीज पुरवठा पूर्ण क्षमतेने सलग दहा तास करावा.
उजनी धरणातून शेतीसाठी कॅनॉल व भीमा नदीत आणखी एक पाणी पाळी सोडावी.
सोलापूर जिल्ह्यातील थकीत उसबिले तात्काळ जमा करावीत.
भीमा नदीवर ठीक ठिकाणी अत्याधुनिक बॅरेजेस बंधारे उभा करावेत.
ऊसबिले जमा न करता संपूर्ण ऊस बिले दिली अशी खोटी माहिती देणाऱ्या साखर कारखान्यावर व त्यांचे चुकीचे ऑडिट करणाऱ्या लेखापरीक्षकावर गुन्हे धाकल करावेत.
महापुरामुळे नदीकाठच्या खरडून केलेल्या जमिनीची नुकसान भरपाई तात्काळ मिळावी.
कर्जमाफीतील अटी शर्ती रद्द करून सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी.
नको असलेला शक्तीपीठ महामार्ग तात्काळ रद्द करावा.
२०२५ मधील पिक विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांना मिळावी.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना वीजपुरवठा करणारा ट्रांसफार्मर जळल्यास तातडीने २४ तासाच्या आत बदलून मिळावेत.
विजेचे पोल पडून, तारा तुटून शेतकऱ्याचे झालेले नुकसान, पोलपडल्यावर तूटल्यावर विधुत पुरवठा बंद होऊन होणाऱ्या नुकसानीचे महावितरण कडून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी.
जिल्हाधिकारी कार्यालयासोरील आंदोलनास नवीन जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आंदोलन करण्यास परवानगी द्यावी आमच्या सर्व मागण्या तात्काळ मंजूर करून सहकार्य करावे.











