21 जून रोजी SPM इंग्लिश मीडियम स्कूल तेथे विश्वकर्मा फाउंडेशन व अहिल्यादेवी बहुउद्देशी सेवा सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत शालेय साहित्याचे वाटप भाजप शहर सरचिटणीस व पतंजलीच्या राष्ट्रीय पदाधिकारी सुधा अळळीमोरे यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्ष स्थान जनकल्याण महिला मल्टीस्टेटचे प्रमुख व सहकार भारतीच्या महिला प्रमुख प्राची धामणगावकर होत्या यावेळी व्यासपीठावर कौशल्य विकास सहाय्यक आयुक्त संगीता खंदारे, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बडवे, विवेक मंचाचे, सिद्धांत बाबरे, विश्वकर्मा फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष गायकवाड उपस्थित होते.

अध्यक्ष संतोष गायकवाड यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये शालेय साहित्य वाटप करताना संस्थेकडून जात धर्म आर्थिक असा कसलाही भेदभाव न करता मागेल त्याला शैक्षणिक साहित्य देऊन मुलांची शैक्षणिक अडचण सोडवण्यासाठी विश्वकर्मा फाउंडेशन प्रयत्न करत आहेत तसेच त्यांनी विश्वकर्मा फाउंडेशन करीत असलेल्या विविध कामाची माहिती दिली.






प्रमुख पाहुण्या सुधा आळीमोरे यांनी आपल्या भाषणात विश्वकर्माचा हा उपक्रम मुलांच्या व पालकांच्या स्वप्नपूर्तीसाठी सहकार्याचे आहे तसेच समाजातील आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या लोकांनी विश्वकर्मा फाउंडेशनच्या कार्याची प्रेरणा घेऊन असे कार्यक्रम राबवावे असे आवाहन त्यांनी केले.आपल्या अध्यक्षनीय भाषणात उपक्रमाचे कौतुक करून शिक्षण हे माणसाला समृद्ध नागरिक बनवते शिक्षणामुळे चांगल्या व वाईटचा फरक जाणवायला लागतो शिक्षणामुळे आपण पुढे काय बनायचे हे आपण ठरवू शकतो असे त्यांनी शिक्षणाचे महत्व संगितले.
सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बडवे यांनी आपल्या भाषणात विश्वकर्मा फाउंडेशन मार्फत मिळणारे मोफत शालेय साहित्य हे मोफत न समजता कर्ज समजावे व आपण सक्षम झाल्यावर कमीत कमी पाच मुलांचा शैक्षणिक खर्च करावा असे अहवान केले.प्रमुख पाहुणे संगीता खंदारे यांनी मुलांना शिकवताना पालकांनी मुलगा व मुलगी याचा भेदभाव न करता मुलींनाही शिक्षण द्यावे तसेच शिक्षण हे चोरी न होणारे धन आहे हे दिल्याने व घेतल्याने वाढत जाते.
सामाजिक कार्यकर्ते सिद्धांत बाबरे यांनी विश्वकर्मा फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले बाबासाहेबांचा संदर्भ देत शिक्षण हे वाघिणीचे दुघ आहे असे बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याची आठवण करून दिली.विश्वकर्मा फाउंडेशन संस्थेचे संचालक चंद्रशेखर सुतार यांनी केले आभार प्रदर्शन रेखा केंगार यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीकृष्ण गायकवाड, समर्थ कळके, अनिता आयवळे, लक्ष्मी शिंदे, यांनी परिश्रम घेतले











