मुंबई : शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शैक्षणिक अभ्यास क्रमात संविधांनिक मूल्यांचा समावेश करावा, अशी मागणी झाली असल्याची माहिती दिली. संविधानिक मूल्यांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यासंदर्भात महत्वाची बैठक पार पडली. भारताच्या संविधानाचा जगभर आदर आहे. संविधान लहान मुलांनी आत्मसात व्हावे, यासाठी शिक्षण विभागाने पाऊले उचलली आहेत. नागरिकशास्त्राच्या पुस्तकातील संविधानाच्या अभ्यास अधिक वाढवत संविधानिक मूल्यांची लहान मुलांमध्ये जोपासना व्हावी यासाठी आमचा प्रयत्न आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
नारायण राणे यांनी मार्च महिन्यात महाराष्ट्रातील सरकार नक्की पडेल आणि भाजपचं सरकार येईल यासंदर्भात दावा केलाय. याबाबत विचारणा केल्यानंतर वर्षा गायकवाड यांनी नारायण राणे मार्चमध्ये पुन्हा सरकार येईल म्हणत असतील तर ते यापूर्वी ही भाजपचं सरकार आलं का? असा सवाल वर्षा गायकवाड यांनी केला. केंद्रीय मंत्र्याने असं स्टेटमेंट देताना भान ठेवले पाहिजे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.