सोलापूर : खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली “कन्याकुमारी ते काश्मीर” पर्यंत जवळपास 3500 किलोमीटरचे अंतर हे पायी चालून पुर्ण करणार आहेत त्यामधे जवळपास देशातील 14 राज्यांमधुन ही पदयात्रा जाणार आहे तरी सदरची ही पदयात्रा महाराष्ट्रामधे दी.7 नोव्हेंबर रोजी येणार असून 20 नोव्हेंबर पर्यंत जवळपास 14 दिवस महाराष्ट्रामधे ही पदयात्रा असणार आहे.तरी सदरच्या पदयात्रेस संपूर्ण देशातून अत्यंत उस्फुर्त असा प्रतिसाद मिळत आहे.तरी आजरोजी सोलापूर महानगरपालिकेतील प्रभाग क्र.15 मधे लोकप्रिय आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत “भारत जोडो यात्रा” मधे अकोला येथे सहभागी होणाऱ्या पदयात्री सदस्यांची नोंदणीची सुरुवात केली.
यावेळी प्रभागातून नगरसेवक चेतन भाऊ नरोटे व नगरसेवक विनोद दादा भोसले यांनी जवळपास 500 ते 700 पदयात्री सहभागी होणार असल्याचे सांगितले तसेच आमदार प्रणिती ताईंच्या उपस्थितीत पदयात्रे मधे सहभागी होणाऱ्या पदयात्रींनी नोंदणीस उस्फुर्त असा प्रतिसाद प्रभाग क्र. 15 मधील नागरिकांनी दिला. यावेळी सोलापूर शहर मध्यच्या लोकप्रिय आमदार प्रणिती ताई शिंदे,प्रभाग क्र १५ चे नगरसेवक चेतन नरोटे,विनोद भोसले,सोलापूर जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभाचे जिल्हाध्यक्ष ॲड.मयुर खरात,शाहु महाराज सलगर,बसु अण्णा कोळी,अमोल भोसले, संभाजी खांडेकर, नितीश पावर, अतिन चवरे,दत्ता काका कोली, करण माशाळ, अमित राठोड, शशांक दांडगे, प्रवीन सावंत, सुमित जाधव, अभिषेक म्हमाणे,बाळासाहेब कोळी,श्रीकांत गायकवाड ,अमोल पाटोळे, बालाजी कोळी,साई कोळी,दिग्विजय सलगर, समर्थ भोसले, महादेव गायकवाड, अजिंक्य गायकवाड, प्रीतम कोळेकर,आकाश सलगर व यावेळी प्रभाग क्र.१५ मधील युवक वर्ग व नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.