सोलापूर शहर -जिल्ह्यात गेल्या रविवारी 70. 5 मिलिमीटर पाऊस झाला. आणि त्यानंतर गेली आठ दिवस फक्त ढगाळ वातावरण आहे. ढग दाटून येतात परंतु केवळ हलका पाऊस पडतो त्यामुळे सोलापूरकरांची चिंता वाढली आहे. पुढील चार दिवसात चांगला पाऊस येईल… असे दररोज हवामान खात्याचे व्यक्त होतात.. त्या आशेवरच सोलापूरकर जगत आहेत. जिल्ह्यात पाऊस कमी असला तरीही भीमा खोऱ्यात काही ठिकाणी चांगला पाऊस सुरू आहे. लोणावळ्याचा भुशी डॅम ओसंडून वाहू लागला आहे. खडकवासला, पानशेत,वरसगाव डॅम,टेमघर या धरणातील पाणीसाठा वाढू लागला आहे. घाटमाथ्यावर चांगला पाऊस सुरू असल्यामुळे आज सकाळच्या आकडेवारीनुसार उजनी धरणात दौंड मधून 6 हजार 883 क्युसेक पाणी येऊ लागले आहे. त्यामुळे काल सकाळी सहा वाजता 28.11 एवढी उणे पातळी असलेल्या उजनी धरणातील पाणी पातळी आज सकाळी मायनस 27.96% एवढी झाली. पाण्याची आणखी आवक वाढण्याची शक्यता आहे. 123 टीएमसी एवढी पाणी साठवण क्षमता असलेल्या उजनी धरणात सध्या 48 टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यंदाच्या वर्षी अलनिनो च्या प्रभावामुळे पाऊस कमी असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.त्यामुळे यंदाच्या वर्षी उजनी भरेल का याची चिंता एकट्या सोलापूर जिल्ह्यालाच नव्हे तर अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्याला देखील लागली आहे.











