गेल्या वर्षी दमदार पाऊस झाला असताना देखील उजनी धरणातील पाणी पातळी गेल्या वर्षीच्या तुलनेत आणखीनच खाली गेली आहे. आजच्या तारखेला गेल्या वर्षी उजनी धरणातील जिवंत पाणीसाठा मायनस 17 टक्के होता तर आज सकाळच्या आकडेवारीनुसार तो यंदाच्या वर्षी मायनस साडेअठरा टक्क्यावर आहे. 123 टीएमसी एवढी पाणी साठवण असलेल्या उजनी धरणात सध्या 53 टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. उजनी धरणात मृतसाठाच जास्त आहे.धरण मायनस पंचवीस टक्केच्या आसपास गेल्यावर कॅनॉलमधून पाणी सोडता येत नाही त्यामुळे सध्या अठराशे क्युसेक वेगाने पाणी सोडणे सुरूच आहे.
मान्सून वेळेवर आणि दमदार आला तरच यंदाच्या वर्षी उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरणार आहे. यंदाच्या वर्षी 88% एवढाच पाऊस असल्याचे अंदाज वर्तवले जात आहेत त्यामुळे उजनीच्या पाण्याची योग्य नियोजन पालकमंत्री तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी आत्तापासूनच करणे खूप गरजेचे आहे.








