क्लायमेट चेंज तसेच अवेळी येणारा पाऊस याचा विचार करून आता देशभरातील धरणांचे धरण सुरक्षा कायद्यानुसार सुरक्षा मूल्यांकन केले जाणार आहे. या अंतर्गत महाराष्ट्रातील उजनी धरणा सह राज्यातील 483 छोट्या आणि मध्यम स्वरूपाच्या धरणांचे हे सुरक्षाविषयक ऑडिट 31 डिसेंबर पर्यंत पूर्ण केले जाणार आहे. देशात सध्या सुमारे 6,100 असून यातील 200 धरणांचे आयुष्य हे शंभर वर्षापेक्षा जास्त झाले आहे. तर जवळपास 1000 धरणे शंभरीच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे ए आय तंत्रज्ञान,जिओ फिनिशिंग अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून धरणाचे आयुष्य आणि सुरक्षितता यासाठी ऑडिट केले जाणार आहे. त्यानुसार काँक्रीट तसेच दगडी बांधकाम साठी योग्य दुरुस्ती,पुनर्बांधणी अथवा सुधारणा याची कार्यवाही केली जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील पवना, खडकवासला माणिक डोह,आंध्रा, वरसगाव डॅम,भामा -आसखेड अशा सहा धरणाचा समावेश असून यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाचा समावेश आहे. उजनी धरणाचे बांधकाम 1969 साली सुरू करण्यात आले आणि ते 1980 साली पूर्ण झाले. 121 टीएमसी एवढी पाणी साठवणूक क्षमता असलेल्या धरणात सध्या 20 टीएमसी एवढा काळ असल्याचे निरी संस्थेकडून नमूद करण्यात आले होते. त्यामुळे आता जलसंपदा विभागाकडून होणाऱ्या या मूल्यांकनाच्या माध्यमातून उजनी धरणाचा अभियांत्रिकी अँगलने खूप महत्त्वाचा डेटा संकलित होणार आहे हे नक्की.











