देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक लक्ष लागले होते पश्चिम बंगालच्या निवडणुकीकडे. या ठिकाणी गेल्या पंधरा वर्षांची ममता बॅनर्जी यांची सत्ता उलटवून टाकत भाजपने दणदणीत बहुमत मिळवले आहे. 294 पैकी भाजपने 187 प्लस जागा मिळाल्या आहेत. 2021 च्या निवडणुकीत भाजपने 77 जागा मिळवल्या होत्या. तर 2021 मध्ये तृणमूल काँग्रेसने 213 जागा मिळवून विजय संपादन केला होता त्यांना 98 जागा मिळाल्या आहेत. पश्चिम बंगाल मध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली असून याचा जल्लोष देशभर सुरू आहे. दीदी चौथ्यांदा पश्चिम बंगाल मध्ये येणार का यावर खूप मोठ्या शर्यती लागल्या होत्या मात्र त्यांना अपयश आले असून मोदी- शहानी या ठिकाणी आपला करिष्मा दाखविला. बहुतांश एक्झिट पोलचे अंदाज पश्चिम बंगालमध्ये खरे ठरले आहेत. तामिळनाडूमध्ये 234 पैकी अभिनेता विजय थलपती यांनी नेत्र दीपक कामगिरी करून शंभर पेक्षा जास्त जागा मिळवल्या आहेत. 126 जागा असलेल्या आसाममध्ये भाजपने तिसऱ्यांदा सत्ता मिळवली आहे. १४० जागा असलेल्या केरळमध्ये काँग्रेसने 99 जागा मिळून यु डी एफ सोबत सत्ता स्थापनेचा मार्ग निश्चित केला आहे.30 जागा असलेल्या पुदुचेरीमध्ये भाजप आणि ए आय एन आर सी यांचे पुन्हा एकदा सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

