सोलापूर – संपूर्ण राज्यात गाजलेल्या मोहोळ तालुक्यातील हॉटेल स्वराज या धाब्यावर ईव्हीएम मशीन सापडल्या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ अभियंताला निलंबित करण्यात आले आहे.या संपूर्ण घटनेची थोडक्यात माहिती अशी की, मोहोळ येथील बांधकाम उपविभागात कार्यरत असलेले प्रसाद पाटील यांची जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी क्षेत्रीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.पंचायत समिती गण क्रमांक 55 कुरुल अंतर्गत मतदान केंद्र क्रमांक 195 ते 201 साठी राखीव 2 कंट्रोल युनिट व 2 बॅलेट युनिट मतदार प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही त्यांनी सुरक्षा कक्षात जमा केले नाही.पाटील यांनी जेवण करण्यासाठी राखीव मतदान यंत्रे ठेवलेली गाडी घेऊन हॉटेल स्वराज या पुणे रोडवरील ढाब्यावर गेले होते.या ठिकाणी गाडीमध्ये मतदान यंत्र असल्याचे काही व्यक्तींच्या लक्षात आल्याने त्यांनी मतदान यंत्र गाडीतून काढून मोकळ्या जागेत रस्त्यावर ठेवून गर्दी जमा केली.
या प्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार दादा गटाचे उमेश पाटील यांनी निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करून निवडणूक आयोगाचे वाबाढे काढले होते.
या संपूर्ण घटनेची चौकशी करून मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी माणिक पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.निलंबन झाल्यानंतर पाटील यांना निलंबन कालावधीत कोणतीही नोकरी अथवा व्यवसाय करता येणार नाही, जर निलंबन कालावधीमध्ये असे निदर्शनास आल्यास ते उदरनिर्वाह भत्ता मिळवण्यास देखील अपात्र ठरतील.निलंबन कालावधीमध्ये पाटील यांचे मुख्यालय पंढरपूर असणार आहे. पूर्व परवानगीशिवाय त्यांंना मुख्यालय सोडता येणार नसल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.











