• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, April 29, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्रासाठी रु २३,९२६ कोटींच्या विक्रमी अर्थसंकल्पीय तरतुदीबाबत दिली माहिती

by Yes News Marathi
February 2, 2026
in इतर घडामोडी
0
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्रासाठी रु २३,९२६ कोटींच्या विक्रमी अर्थसंकल्पीय तरतुदीबाबत दिली माहिती
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

रेल्वे मंत्री यांनी महाराष्ट्रासाठी रु २३,९२६ कोटींच्या विक्रमी अर्थसंकल्पीय तरतुदीबाबत माध्यमांना माहिती दिली

अश्विनी वैष्णव, माननीय रेल्वे मंत्री यांनी (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे) महाराष्ट्रासाठीच्या रेल्वे बाबतीतील अर्थसंकल्पीय तरतुदींविषयी माध्यमांना संबोधित करताना सांगितले की, अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये महाराष्ट्रासाठी रु २३,९२६ कोटींची विक्रमी तरतूद रेल्वे करीता करण्यात आली आहे.

२००९-१४ या कालावधीत महाराष्ट्रातील रेल्वेकरीता दरवर्षी दिल्या जाणाऱ्या सरासरी रु १,१७१ कोटींच्या तरतुदीच्या तुलनेत ही तरतूद जवळपास २० पट अधिक आहे.

अर्थसंकल्पात एकूण ७ उच्चगती रेल्वे प्रकल्पांची घोषणा करण्यात आली असून, त्यापैकी २ नवीन बुलेट ट्रेन कॉरिडॉर महाराष्ट्रातील आहेत. संबंधित प्रवास वेळेसह त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

• मुंबई–पुणे : ४८ मिनिटे
  • पुणे–हैदराबाद : १ तास ५५ मिनिटे (२ तासांच्या आत)

पायाभूत सुविधांमध्ये आमूलाग्र परिवर्तन: एकूण रु १,७०,०५८ कोटींची कामे प्रगतीपथावर आहेत. या भव्य गुंतवणुकीत संपूर्ण महाराष्ट्रभर नवीन रेल्वेमार्गांची उभारणी, स्थानकांचे पुनर्विकास तसेच संरक्षासाठीच्या सुधारणा यांचा समावेश आहे.

अमृत स्टेशन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील १३२ स्थानकांची संपूर्ण नवनिर्माणासाठी निवड करण्यात आली आहे.
स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी एकूण गुंतवणूक : रु ५,६७५ कोटी.

राज्यात प्रीमियम रेल्वे सेवांच्या परिचालनामुळे प्रवास कार्यक्षमतेला नवे उंची प्राप्त झाली आहे:

  • वंदे भारत एक्सप्रेस : १२ जोड्या
  • अमृत भारत एक्सप्रेस : ५ जोड्या

महाराष्ट्रातील रेल्वे जाळ्याचा वेगाने विस्तार झाला आहे:

  • रेल्वेमार्ग निर्माण : २०१४ पासून सुमारे २,४००किमी रेल्वेमार्गांचे बांधकाम करण्यात आले आहे. हे मलेशियाच्या संपूर्ण रेल्वे जाळ्यापेक्षा अधिक आहे.
  • संपूर्ण विद्युतीकरण : राज्यात १००% विद्युतीकरण पूर्ण झाले असून, २०१४ पासून ३,७४४ किमी रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण करण्यात आले आहे.
  • रस्ता सुरक्षितता सुधारण्यासाठी १,२२८ रेल्वे उड्डाणपूल व रेल्वे अंडरपास मार्गांचे बांधकाम करण्यात आले आहे.
  • कवच प्रणालीस ४,९७१ रूट किमी (RKM) वर मंजुरी देण्यात आली असून, त्यापैकी ५७६ रूट किमी (RKM) वर कार्यान्वयन झाले आहे आणि ३,६१७ रूट किमी (RKM) वरील कामे/निविदा प्रक्रिया सध्या प्रगतीपथावर आहेत.

प्रेस ब्रिफिंगदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे श्री प्रतीक गोस्वामी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे; अवनीश कुमार पांडे, मुख्य प्रशासकीय अधिकारी (निर्माण); रजनीश माथूर, प्रधान मुख्य अभियंता; अरविंद मालखेड़े, प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे तसेच हिरेश मीना, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई विभाग हे उपस्थित होते.


Previous Post

भाजपच्या बालेकिल्ल्याला सेनेचे नवे शिलेदार सुरुंग लावणार का?

Next Post

मातोश्री जनाबाई इंगळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्रीराम कथा व पुरस्कार सोहळा

Next Post
मातोश्री जनाबाई इंगळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्रीराम कथा व पुरस्कार सोहळा

मातोश्री जनाबाई इंगळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्रीराम कथा व पुरस्कार सोहळा

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In