प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयाने पद्म पुरस्कारांची घोषणा केली.यामध्ये महाराष्ट्र राज्याला एक पद्मविभूषण, तीन पद्मभूषण सह अकरा पद्मश्री पुरस्कार मिळाले आहेत. या कर्तबगार विभूतींची नावे याप्रमाणे.
आपल्या सहज सुंदर अभिनयाने ही मॅन अशी आपली आगळीवेगळी ओळख निर्माण केलेल्या धर्मेंद्र सिंग देओल अर्थात अभिनेता धर्मेंद्र यांना कलाक्षेत्रासाठी पद्मविभूषण हा मरणोत्तर पुरस्कार घोषित करण्यात आला.तसेच कलाक्षेत्रातच सुप्रसिद्ध गायिका अलका याग्निक यांना पद्मभूषण, तर पियुष पांडे यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार घोषित झाला आहे.व्यापार उद्योगातील उद्योग रत्न उदय कोटक यांना देखील पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
पद्मश्री पुरस्कारांमध्ये औषध क्षेत्रातील आर्मिंडा फर्नांडिस,व्यापार उद्योग क्षेत्रातील अशोक खाडे,तारपा या आदिवासी वाद्य प्रकाराला नवी ओळख देणारे भिकल्या लाडक्या धिंडा,सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे जनार्दन बापूराव बोठे, विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे जुझर वासी,चित्रपटात आव्हानात्मक व्यक्तिरेखा सादर करणारे सुप्रसिद्ध कलाकार माधवन रंगनाथ अर्थात आर. माधवन,तमाशा क्षेत्राला लोकप्रतिष्ठा मिळवून देणारे रघुवीर तुकाराम खेडकर,आक्रमक खेळीसाठी तडाखेबाज फलंदाज म्हणून प्रसिद्ध असलेला रोहित शर्मा,हलक्या फुलक्या, सहज सुंदर, विनोदी आणि चरित्र पात्राला जिवंत करणारे ज्येष्ठ कलाकार सतीश शहा यांना मरणोत्तर; तर शेती क्षेत्रात नाविन्यपूर्ण शेती करणारे श्रीरंग देवबा लाड यांचा समावेश आहे.

