सोलापूर शहर उत्तर मतदार संघातील भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तीनही आमदारांच्या हातात काहीही नसून पालकमंत्री जे म्हणतील त्यांनाच उमेदवारी निश्चित केली जात आहे. एवढेच नव्हे तर शहर उत्तर मध्ये पालकमंत्री हेच सर्व तिकीट फायनल करीत आहेत. त्यांचाच हस्तक्षेप आहे. पक्षात बाहेरून आलेल्यांना उमेदवारी निश्चित केल्याचे समजत आहे त्यामुळे मी भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्याच्या बाजूने निवडणुकीत उभा राहणार आहे. तो कोणत्याही पक्षात गेला तर त्याचाच प्रचार करणार आहे असं मत देखील आमदार विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केले. त्यामुळे आता महापालिका निवडून येतील आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख हे उघडपणे पालकमंत्र्यांच्या विरोधात जातील आणि आपल्याच कार्यकर्त्यांना ज्यांना तिकीट मिळाले नाही त्यांना निवडून आणण्यासाठी ताकद लावतील असे सध्या तरी चित्र आहे.

