बांगलादेशातील हिंदू विरोधी कारवाया वाढत असूनच परवा दिपू चंद्र दास या युवकाला अत्यंत अमानवी पद्धतीने ठार करून त्याच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली. याच्या निषेधार्थ भारतातील हिंदुत्ववादी संघटनांनी बांगलादेश दूतावासासमोर प्रखर निदर्शने नोंदवत संताप व्यक्त केला. त्यानंतर छत्रपती शिवाजी टर्मिनस स्टेशन समोर देखील बांगलादेश विरोधात घोषणाबाजी करत तीव्र असंतोष प्रकट केला.

