लोकमंगल साखर कारखान्याच्या दोन्ही युनिटने अद्यापही ऊसदर जाहीर न केल्याने जनहित शेतकरी संघटनेचे भैय्या देशमुख यांनी काल पालकमंत्री जयकुमार गोरे यांना फोन करून ऊसदर आंदोलनाची माहिती दिली. जिल्ह्यातील इतर कारखाने 3000 पेक्षा अधिक दर जाहीर करीत आहेत, मात्र आमदार सुभाष देशमुख यांच्या लोकमंगलचे दोन्ही कारखाने दर जाहीर करत नसल्याची तक्रार केली. त्यावर मी लक्ष घालतो असे गोरे यांनी सांगितले.

