बोर्डाच्या चकरा आणि हेलपाटे थांबणार..
दहावी – बारावीचे द्वितीय गुणपत्रक, तात्पुरते प्रमाणपत्र व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी आता पुणे बोर्ड कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या ही प्रमाणपत्रे उपलब्ध करून घेता येणार आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या या निर्णयामुळे विद्यार्थी व पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.ऑनलाइन अर्ज प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि सोपी करण्यासाठी अर्जदाराला आधार क्रमांकावर आधारित ओटीपी द्वारे अर्ज करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांची ओळख त्वरित आणि अचूकपणे पडताळणी केली जाईल. यासाठी पाचशे रुपयांचे शुल्क आकारले जाणार आहे.विद्यार्थी आता बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घरी बसून अर्ज करू शकतील.विशेष म्हणजे अर्ज करताना आता शाळेच्या शिफारस पत्राची किंवा मुख्याध्यापकांच्या सही शिक्क्याची गरज नाही.ही अट रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांचा शाळेतील पाठपुरावाचा वेळ वाचणार आहे आणि शिवाय पुणे बोर्डात चकरा मारायची गरज नसून हेलपाटे देखील थांबणार आहेत.

