• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, May 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी : छत्रपती श्री शिवाजी महाराज कथेस सोलापूरकरांची गर्दी

by Yes News Marathi
September 22, 2024
in इतर घडामोडी
0
प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी : छत्रपती श्री शिवाजी महाराज कथेस सोलापूरकरांची गर्दी
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पावनखिंड हे राष्ट्रीय स्वातंत्र्याचे तीर्थक्षेत्र

सोलापूर : छत्रपती श्री शिवरायांसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशीद यांच्यासारख्या वीरांमुळे पावनखिंड हे भारतीय राष्ट्रीय स्वातंत्र्याचे तीर्थक्षेत्र बनले, असे प्रतिपादन छत्रपती श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र अयोध्याचे कोषाध्यक्ष प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी यांनी केले.

३५० व्या श्री शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त समस्त हिंदू समाजातर्फे जुनी मिल कंपाउंड येथील नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये २५ सप्टेंबरपर्यंत आयोजित छत्रपती श्री शिवाजी महाराज कथेच्या चौथ्या दिवशी रविवारी प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी यांनी मार्गदर्शन केले. ‘शिवधैर्य’ या विषयावर बोलताना त्यांनी पन्हाळगडाचा वेढा, पावनखिंडीतील शौर्य, चाकणचा रणसंग्राम, लाल महालावर छापा आणि शाहिस्तेखानावर मात आदींवर विवेचन केले.

प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी म्हणाले, निस्वार्थ भूमिकेतून जिथे धर्मयोद्धे आपले प्राण देव, देश, धर्मासाठी अर्पण करतात तिथे राष्ट्रीय तीर्थ निर्माण होते. प्रत्येकाने ऊर्जा घेण्यासाठी अशा ठिकाणी जावे.

संभाव्य संकटांचा अंदाज घेऊन त्यावर मात करण्यासाठी अचूक योजना आखण्याची विलक्षण क्षमता श्री शिवछत्रपतींमध्ये होती. त्यांचाच आदर्श घेऊन प्रत्येक हिंदूने जात, भाषा, संप्रदाय विसरून ‘हिंदू सारा एक’ हा मंत्र अंगी भिनवला पाहिजे, असेही प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी यांनी सांगितले.

श्रीलंका ते भारत सलग १० तास २५ मिनिटे पोहून सोलापूरच्या कीर्ती भराडिया यांनी केलेल्या विश्वविक्रमाबद्दल त्यांचा प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सी. ए. राजगोपाल मिणीयार यांनी प्रास्ताविक तर गुरुशांत धुत्तरगावकर यांनी सूत्रसंचालन केले.

आज ‘ शिवशौर्य ‘ या विषयावर मार्गदर्शन

छत्रपती श्री शिवाजी महाराज कथेमध्ये सोमवारी दुपारी ४ ते ७.३० दरम्यान प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी ‘ शिवशौर्य ‘ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी सोलापूरकरांनी या कथेस उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त हिंदू समाजातर्फे करण्यात आले आहे.

Previous Post

डॉ.वाघचवरे यांनी इटलीमध्ये रोवला भारताचा झेंडा;फुल आयर्न मॅन होणारे सोलापूरचे पहिलेच सुपुत्र

Next Post

पंडीत भिमण्णा जाधव, मास्टर व्यंकटेशकुमार या पितापुत्रांना सुंद्रीवादनकरिता मध्यप्रदेश सरकार कडून निमंत्रण

Next Post
पंडीत भिमण्णा जाधव, मास्टर व्यंकटेशकुमार या पितापुत्रांना सुंद्रीवादनकरिता मध्यप्रदेश सरकार कडून निमंत्रण

पंडीत भिमण्णा जाधव, मास्टर व्यंकटेशकुमार या पितापुत्रांना सुंद्रीवादनकरिता मध्यप्रदेश सरकार कडून निमंत्रण

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group