येस न्युज नेटवर्क : शिवरायांनी ज्या वाघनखांच्या साहाय्याने स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा वध केला. ती वाघनखं आता महाराष्ट्रात दाखल होणार आहेत. एप्रिल किंवा मे मध्ये वाघनखं महाराष्ट्रात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिलीये. यापूर्वी नोव्हेंबर महिन्यातचं ही वाघनखं महाराष्ट्रात येणार असल्याचा दावा, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता. तर जानेवारीमध्ये आणण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु होते. मात्र, ब्रिटन सरकारकडून प्रक्रिया सुरु असल्याने याला विलंब झालाय. आता एप्रिल किंवा मे महिन्यात वाघनखांचा मुहूर्त ठरलाय. शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी ही वाघनखं महाराष्ट्रात आणण्याचा राज्यसरकारचा मानस आहे.
शिवाजी महाराजांनी 15 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला होता. अफजलखानाच्या वध केल्यानंतर शिवरायांना आदिलशाहीला नामोहरण करण्यासाठी बळ मिळालं होतं. दरम्यान, शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध ज्या वाघनखांनी केला होता, ती वाघनखं ब्रिटनमधून परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार आग्रही आहे. ती वाघनखं सध्या ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अँड अॅल्बर्ट संग्रहालयात आहेत. सर्व काही ठरल्याप्रमाणं घडलं तर या वर्षीच ही वाघनखं भारतात परत आणण्यात येतील, असे सुधीर मुनगंटीवार होते.