मुंबई : मुंबई ही अनेकांसाठी सोन्याचं अंडे देणारी कोंबडी आहे, पण शिवसेनेने तसा कधी विचार केला नाही. मुंबईतील कष्टकऱ्यांना घरे बांधून देण्यासंबंधी राज्य सरकार गांभिर्याने विचार केला असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. ते सभागृहात बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ” 1995 साली युतीची सत्ता आल्यानंतर झोपडपट्टीयांना घरे मिळावीत यासाठी बाळासाहेबांनी प्रयत्न केले. मुंबईचा विचार हा अनेकदा सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून करण्यात आला. आता त्या कष्टकऱ्यांना घरे मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने गांभिर्याने विचार केला आहे. मुंबईसाठी ज्यांनी संघर्ष केला त्यांच्यासाठीचा विचार प्रत्यक्षात या सरकारकडून आणलं जात आहे.
त्याबद्दल शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून मला अभिमान वाटतोय.” धारावीचा पुनर्विकास हा केंद्राच्या धोरणामुळे रखडला असल्याचा आरोप मुख्ममंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. त्याचवेळी महाविकास आघाडीचे सरकार कष्टकऱ्यांना त्यांच्या हक्काची घरं बांधून देणार असल्याचं ते म्हणाले.

