• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, July 28, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

लसीचा तिसरा डोसही गरजेचा : सायरस पूनावाला

by Yes News Marathi
August 13, 2021
in इतर घडामोडी
0
लसीचा तिसरा डोसही गरजेचा :  सायरस पूनावाला
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे: करोना प्रतिबंधक लसीची निर्मिती करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांनी लसीकरणाबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. ‘करोनाचे दोन डोस घेतल्यानंतरही सहा महिन्यानंतर व्यक्तीच्या शरीरातले अँटीबॉडीज कमी होतात. त्यामुळे दोन डोसनंतर तिसरा बूस्टर डोस गरजेचा आहे,’ असे पूनावाला यांनी म्हटले आहे.सायरस पूनावाला यांना आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

लसीकरण, लॉकडाऊन व सरकारी धोरण अशा सर्वच मुद्द्यावर सायरस पूनावाला यांनी रोखठोक मते मांडली. ‘कोविड प्रतिबंधक लसीचे केवळ दोन डोस पुरेसे नसून तिसरा डोसही गरजेचा आहे. करोनाचा प्रादुर्भाव कायम राहिल्यास कदाचित बूस्टर डोसनतर पुन्हा लस घ्यायला लागू शकते,’ असं ते म्हणाले. ‘लसीचा दुसरा डोस दोन ते तीन महिन्याच्या आत घेणं योग्य आहे. लस उपलब्ध नसल्यामुळं सरकारनं ८४ दिवसांची अट घातली. कॉकटेलचा लसीचा पर्याय देखील योग्य नाही. त्याचे दुष्परिणाम आल्यास कोणाला जबाबदार धरणार,’ असा सवाल त्यांनी केला. करोनाची तिसरी लाट तीव्र नसेल, असे वाटते . सामुदायिक रोग प्रतिकार शक्ती आणि लसीचं संरक्षण असल्याने लाट आली तरी तिची तीव्रता कमी असेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन हा प्रभावी उपाय असल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे. तसे निर्णयही घेतले जात आहेत. मात्र, लॉकडाउन लावणे योग्य नाही. सरकारने लॉकडाउन लावूच नये,’ असे पूनावाला यांनी म्हटले आहे. ‘करोना मृत्युदर खूपच कमी आहे. मृत्यू वाढत असतील, तरच लॉकडाउनचा पर्याय स्वीकारावा,’ असा सल्ला त्यांनी दिला.

Previous Post

पंतप्रधान मोदी म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज नसते तर…”

Next Post

राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या मृतांची संख्या तीनवर

Next Post

राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या मृतांची संख्या तीनवर

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group