• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

थोडा आत्मविश्वास आम्हालाही उधार द्या , संजय राऊतांचा मोदी सरकारला टोला

by Yes News Marathi
August 11, 2021
in इतर घडामोडी
0
थोडा आत्मविश्वास आम्हालाही उधार द्या , संजय राऊतांचा मोदी सरकारला टोला
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली : देशात एखाद्या समाजाला मागास ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारांनाच देणारे १२७व घटनादुरुस्ती विधेयक मंगळवारी लोकसभेत मंजूर झाले असून त्यावर आज बुधवारी राज्यसभेत चर्चा झाली. या चर्चेदरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका करतानाच सत्ताधारी भाजपाला खोचक टोला देखील लगावला. “चूक झाल्यानंतर तिचा इव्हेंट कसा करावा आणि चूक सुधारल्यानंतर त्याचा उत्सव करण्याचाही इव्हेंट कसा करावा, हे सरकारकडून शिकायला हवं. चुकीचाही उत्सव आणि चूक सुधारण्याचाही इव्हेंट, एवढा कॉन्फिडन्स सरकारकडे येतो कुठून?” असा खोचक टोला संजय राऊत यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपाला लगावला आहे.

संजय राऊत यांनी यावेळी बोलताना १०२व्या घटनादुरुस्तीवरून मोदी सरकारवर निशाणा साधला. “२०१८मध्ये १०२व्या घटनादुरुस्तीनुसार राष्ट्रीय मागास आयोगाला अधिकार दिल्यामुळे सर्व राज्यांचे अधिकार केंद्राला आले. तेव्हाच सगळ्यांनी इशारा दिला होता की इतके सगळे अधिकार तुम्ही एका केंद्रीय आयोगाला देऊ नका. पण सरकारने तेव्हा चूक केली होती आणि चूक झाल्यानंतर देखील सरकार आपलीच पाठ थोपटत होते , असे संजय राऊत यावेळी म्हणाले.“चुकीचा इव्हेंट कसा करावा आणि मग चूक सुधारल्यानंतर त्याचा उत्सव करण्याचा इव्हेंट हे सरकारकडून शिकायला हवं. एवढा आत्मविश्वास सरकारकडे कुठून येतो. जर इतका आत्मविश्वास असेल, तर थोडा आम्हालाही उधार द्या. इथेही आत्मविश्वासाची गरज आहे”, असं म्हणत संजय राऊतांनी विरोधी बाकांच्या दिशेने इशारा करताच सभागृहात हास्याची लकेर उमटली.
“महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. आपल्या हातात नेहमीच देशाच्या संरक्षणासाठी तलवार किंवा बंदूक राहिली आहे. हेच आमचे काम राहिले आहे. आमच्या हातात कधी तागडी-तराजू नाही आला, ना कधी चोपडी आली. आम्ही तर लढत राहिलो. सामाजिक न्यायाची अपेक्षा ठेऊन आम्ही आज उभे आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज शाहू महाराजांनी आपले राज्य असलेल्या कोल्हापुरात सामाजिक न्याय स्थापित करण्यासाठी या देशात सर्वात आधी पाऊल उचलले होते ”, असे राऊत यावेळी म्हणाले.

Previous Post

पक्षातले वरिष्ठ नेते जी जबाबदारी देतील ती सांभाळणार

Next Post

सोलापूर विद्यापीठ । पीएचडीच्या प्रवेशपूर्व परिक्षेसाठीअर्ज करण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ

Next Post
सोलापूर विद्यापीठ । पीएचडीच्या प्रवेशपूर्व परिक्षेसाठीअर्ज करण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ

सोलापूर विद्यापीठ । पीएचडीच्या प्रवेशपूर्व परिक्षेसाठीअर्ज करण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group