• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, July 17, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

बिहारच्या शिक्षकांवर बारदाना विकण्याची नामुष्की

by Yes News Marathi
August 9, 2021
in इतर घडामोडी
0
बिहारच्या शिक्षकांवर बारदाना विकण्याची नामुष्की
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पाटना : जुलै महिन्याच्या अखेरपासून दरदिवशी सकाळी मोहम्मद तमिझुद्दीन हे स्थानिक बाजारपेठेत गोणपाट किंवा आपण ज्याला बारदाना म्हणतो, ते विकत बसतात आणि येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला बारदाना खरेदी करण्याची विनंती करतात. मोहम्मद तमिझुद्दीन हे बिहारमधील केवडा या गावातील सरकारी शाळेचे मुख्याध्यापक आहेत. बारदाना विका नाही तर तुमचा पगार मिळणार नाही असा अजब फतवा बिहार सरकारने काढला असून त्यामुळे बिहारच्या शिक्षकांवर मोकळी बारदाना विकावे लागण्याची नामुष्की ओढावली आहे.

मोहम्मद तमिझुद्दीन हे बिहारमधील कटिहार जिल्ह्यातील काडवा ब्लॉकमधील सरकारी शाळेचे मुख्याध्यापक आहेत. शिक्षकांनी बारदाना विकला तरच मिळणार पगार मिळणार असा बिहार सरकारचा आदेश आहे. त्यामुळे रोज सकाळी उठून ते काडवामधील बाजार पेठेत जातात आणि आपल्याकडचे रिकामे बारदाना विकण्यासाठी जोरजोरात ओरडत असतात. एका बारदानाची किंमत 10 रुपये असून ते ग्राहकांनी घ्यावेत अशी ते प्रत्येकाला विनंती करतात. आपल्याकडील बारदाना विकली गेली नाहीत तर आपल्याला पगार मिळणार नाही असंही ते कळवळीने सांगतात. पण ही रिकामी बारदाना काही विकली जात नाहीत. कारण एकतर ती उंदरांनी कुरतडलेली असतात किंवा जुनी झालेली किंवा उसवलेली असतात. त्यामुळे मोहम्मद तमिझुद्दीन यांच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसत असते. बिहार सरकारने एक आदेश काढून राज्यातील पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व शिक्षकांना अशी मोकळी बारदाना विकायची कामं लावली आहेत. या शिक्षकांची संख्या जवळपास 80,000 इतकी आहे. या शिक्षकांनी त्यांना दिलेले बारदाना विकली नाहीत तर त्यांना पगार मिळणार नाही असा आदेशही बिहार सरकारने जारी केला आहे. सरकारी शाळांना मध्यान आहार योजनेसाठी ज्या बारदानातून तांदूळ वा अन्नधान्य पुरवण्यात येतात ती मोकळी झाल्यावर शिक्षकांनी विकावी असा आदेश बिहारच्या नितीश कुमार सरकारने सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी म्हणजे डीपीओंना दिला आहे. मध्यान आहार योजनेचे सचिव सतिश चंद्र झा यांनी एका पत्राद्वारे हा आदेश जारी केला आहे.

Previous Post

क्यू आर कोड तपासण्यासाठी राज्य सरकारने यंत्रणा उभी करावी : दानवे

Next Post

मोदींकडून 9.75 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 19,500 कोटी जमा

Next Post
मोदींकडून 9.75 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 19,500 कोटी जमा

मोदींकडून 9.75 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 19,500 कोटी जमा

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group