येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापुरातील नामांकित कंपनी बालाजी अमाईन्सने आपल्या सामाजिक बांधिलकीची परंपरा जपत पूरग्रस्तांना मदत मिळावी या उद्देशाने दि. २९ जुलै २०२१ रोजी रु. १ कोटीचे धनादेश CSR अंतर्गत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात आले, कंपनीचे व्यवस्थापकिय संचालक डी. राम रेड्डी यांनी मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे धनादेश सुपूर्द केले. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी कंपनीचे कौतुक केले असून आभार मानले. सध्याच्या परिस्थितीत उद्योगांनी मदतीसाठी पुढे येण्याचे आव्हान त्यांनी यावेळी केले.
प्रतिनिधींशी बोलताना व्यवस्थापकिय संचालक डी. राम रेड्डी म्हणाले कि आजपर्यंत बालाजी अमाईन्सने CSR अंतर्गत शिक्षण, खेळ, आरोग्य व स्वछता, जलपुरवठा व जल संवर्धन क्षेत्रात आपले योगदान देत आहे, इतकेच नव्हे तर राष्ट्रीय आपत्ती असो वा शहीद जवानांच्या कुटुंबियांना आधार अथवा कोरोना संकट, कंपनीने नेहमीच समाजाच्या मदतीसाठी नेहमीच अग्रेसर राहिली आहे आणि असेच अखंडपणे सामाजिक दायित्व जपण्याची कामना त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.