येस न्युज मराठी नेटवर्क । देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरताना दिसत असली, तरी देखाल अद्यापही नवीन करोनाबाधित आढळून येतच आहेत. तर, देशातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. मागील २४ तासांत देशभरात ५० हजार ४० नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ५७ हजार ९४४ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर, १ हजार २५८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.
देशातील एकूण बाधितांची संख्या ३,०२,३३,१८३ झाली आहे. आजपर्यंत २,९२,५१,०२९ रूग्ण बरे झाले असून, ३,९५,७५१ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. देशातील अॅक्टिव केसेसची संख्या ५,८६, ४०३ झाली आहे. देशातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.७५ टक्के आहे.
दरम्यान, देशात जून महिन्यात करोनाच्या रोज १८ लाखांपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत ४० कोटींचा टप्पा ओलांडला गेला आहे, अशी माहिती भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने दिली आहे.