येस न्युज मराठी नेटवर्क : (समाधान रोकडे) उत्तर सोलापूर तालुक्यातील 2500 ते 3000 लोकसंख्या असलेल्या पडसाळी गावात गेल्या 2 ते 3 वर्षात शिमला मिरचीची लागवड खूप मोठया प्रमाणात केली जाते.या मिरचीने पडसाळी गावाचा महाराष्ट्र तसेच इतर राज्यात देखील नावलौकिक झाल्याचे दिसून आले.जर वर्षी प्रमाणे मे संपत येण्याची अगोदर नागरने,भोद घालणे,खत,मल्चिंग इत्यादी कामे पूर्ण करून 15 जूनला शेतकरी शिमला मिरचीची लागवड करन्यास सुरुवात करतात.त्यामुळे शिमला मिरचीचे काम आता अंतिम टप्प्यात आल्याचे चित्र येत आहेत.या शिमला मिरची पासून कमी कालावधीत जास्त उत्पन्न मिळत असल्याने जास्तीत जास्त शेतकरी या पिकाची लागवड घेतात.संपूर्ण गावातुन शिमला मिरचीची 400 ते 500 एकर लागवड जर वर्षी होत असते.जास्त लागवड असल्याने या ठिकाणी 400 ते 500 रुपये हजरी देऊन देखील मजूर उपलब्ध होत नसल्याने शाळा बंद असल्याने लहान मुले देखील आई वडिलांना मदत करत असल्याचे दिसन येत आहे.