महाराष्ट्रात ग्रहणाचे नियम पाळायची गरज नाही : पंचांगकर्ते दाते
सोलापूर : वैशाख शुद्ध पौर्णिमेस म्हणजे बुधवारी रात्री दिसणारे खग्रास चंद्रग्रहण भारताच्या अतिपूर्वेकडील म्हणजे ईशान्य भारतातून दिसणार आहे. महाराष्ट्रात हे ग्रहण दिसणार नसल्याने ग्रहणाचे कोणतेही नियम पाळू नयेत असे, दाते यांनी म्हटले आहे.
हे ग्रहण खंडग्रास स्थितीमध्ये दिसणार असल्याचे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले .ईशान्य भारत वगळता उर्वरित भारतामध्ये कोठेही हे ग्रहण दिसणार नाही. ओरिसा , आसाम, मिझोराम , मेघालय , नागालँड, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर या प्रदेशातून हे चंद्रग्रहण दिसणार आहे. उर्वरित भारतामध्ये ग्रहण दिसणार नसल्याने ग्रहणाचे कोणतेही नियम पाळू नयेत असेही पंचांगकर्ते दाते यांनी म्हटले आहे.
