मुंबई : उद्योजक मनसुख हिरेन मृत्यू आणि उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर तेच पुरावे पुन्हा शोधण्याची मोहीम एनआयएतर्फे राबविली जातेय. बीकेसी येथील मिठी नदीत काही पुरावे नष्ट केल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. त्यानंतर एनआयएने या नदीमध्ये शोधमोहीम राबवली. यावेळी अनेक प्रकारचे साहित्य एनआयएच्या हाती लागले आहे. बीकेसी येथील मिठी नदीतून संगणकाचे काही सुटे भाग, डीव्हीआर तसेच इतर साहित्य बाहेर काढण्यात बाहेर आले आहे. हा मोठा ऐवज हाती लागल्यानंतर आता मनसुख हिरेन मृत्यू आणि मुकेश अंबानी धमकी प्रकरणाचा उलगडा लवकर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.