लक्षावधी शेतकरी कामगार केंद्र सरकारच्या प्रतिगामी कायद्याविरुद्ध पुकारला एल्गार !
सोलापूर – संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने 28 नोव्हेंबर 21 रोजी मुबंई आझाद मैदान येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून शहीद किसान अस्थी कलश यात्रा समारोप व किसान महापंचायत चे आयोजन करण्यात आले. यावेळी सभेला ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर संबोधित केले.
यावेळी ते म्हणाले की,शेतकरी आपल्या एकजुटीने सरकार ला नमवले.कामगार ही नमवतील. परिहवन मंत्री अनिल अरब यांनी हे पोलिस यंत्रणा हाताशी धरून एस.टी.कामगारांचा संप फोडण्याचा कुटील डाव रचलेला आहे. ते आम्ही हाणून पाडू. देशाचे नेते शरद पवार यांना आपले आवाहन करत आहोत की,पवार हे महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार आहेत.त्यांच्या सरकार कडून कामगारांवर दमनशाही चालु आहे.ते तात्काळ थांबवा अन्यथा हा लढा आणखी उग्र रूप धारण करेल.
या महापंचायत कार्यक्रमास सोलापूर सह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन लाखोंच्या संख्येने शेतकरी व कामगार सामील झाले.