सोलापूर प्रतिनिधी : (समाधान रोकडे) : उत्तर सोलापूर तालुक्यातील कौठाळी गावच्या सरपंच चंद्रप्रभा भास्कर यांची सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र समन्वय पदी निवड करण्यात आली.सोलापूर येथे संघटने अँड.विकास जाधव यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी येथे उपस्थित जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख,महिला जिल्हाध्यक्ष कविता घोडके पाटील,जिल्हा समन्वयक पंडित ढवण, कुलदीप कौलगे उपस्थित होते यावेळी येथे उत्तर सोलापूर तालुका समन्वयक पदी अकोलेकाटी चे सरपंच भाऊसाहेब लामकाने,नंदूरचे सरपंच संभाजी पाटील,नान्नज ग्रामपंचायत सदस्या अरुणा गवळी यांची देखील निवड करण्यात आली.सरपंच परिषदच्या माध्यमातून गावचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे भाऊसाहेब लामकाने यावेळी म्हणाले.









