सोलापूर : (समाधान रोकडे) शेतकरी राजाने पावसाळा सुरू होण्याच्या अगोदरच शेतात जी वेगवेगळी पिके घेतली जातात त्या पिकाच्या उद्देशानं अनेक प्रकारची खते, बियाणे,रोपे घेऊन पूर्ण तयारी सी असताना पावसाळा सुरू होऊन महिनाअखेर गाठला तरीदेखील सोलापूर तसेच इतर तालुक्यात म्हणावा असा पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांसमोर चिंतेचा विषय ठरत आहे.पाऊस न झाल्यास खरीब हंगामात जी पिके घेतली जातात त्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होईल अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागत.उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी या गावचा आदर्श घेऊन अनेक गावात ढोबळी मिरचीची लागवड खूप मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे .ढोबळी मिरचीसाठी 1 एकरास 70 ते 80 हजार रुपये खर्च होतो.त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागात ढोबळी मिरचीची लागवड खूप मोठ्या प्रमाणात झाली आहे.त्यामुळे शेतकरी आता फक्त पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे चिन्ह दिसून येत आहे लाखो रुपये खर्च करून शेतात पाणी नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडेल की काय असे चित्र दिसत आहे.