• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, August 18, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

टीम इंडियाने अखेरच्या वन-डे सामना १३ धावांनी जिंकला

by Yes News Marathi
December 2, 2020
in मुख्य बातमी
0
टीम इंडियाने अखेरच्या वन-डे सामना १३ धावांनी जिंकला
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : शार्दुल ठाकूर, टी. नटराजन, जसप्रीत बुमराह यांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर टीम इंडियाने अखेरच्या वन-डे सामन्यांत
ऑस्ट्रेलियाचं आव्हान मोडीत काढत बाजी मारली आहे. अंतिम सामन्यात १३ धावांनी बाजी मारत भारतीय संघाने व्हाईटवॉशची नामुष्की टाळली आहे. ऑस्ट्रेलियाकडून फिंच, मॅक्सवेल यांनी फटकेबाजी करत चांगली झुंज दिली, परंतू मोक्याच्या क्षणी भारतीय गोलंदाज वरचढ ठरले.

३०३ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. वॉर्नरच्या अनुपस्थितीत सलामीला बढती मिळालेला लाबुशेन नटराजनच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर शार्दुल ठाकूरने स्टिव्ह स्मिथला माघारी धाडत कांगारुंची मैदानावर जम बसू पाहत असलेली जोडी फोडली. दोन सामन्यांत शतक झळकावणारा स्मिथ अखेरच्या वन-डेत ७ धावां काढून माघारी परतला. यानंतर हेन्रिकेज आणि फिंच यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. यात दोघांना यश येतंय असं दिसत असतानाच विराटने पुन्हा एकदा शार्दुल ठाकूरकडे चेंडू दिला. शार्दुलनेही आपल्या कर्णधाराला निराश न करता हेन्रिकेजला माघारी धाडत टीम इंडियाला महत्वाचा बळी मिळवून दिला.

दरम्यान एक बाजू सांभाळून असलेल्या फिंचने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल करत फिंचने ८२ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ७५ धावांची खेळी केली. जाडेजाने फिंचला माघारी धाडत ऑस्ट्रेलियाच्या अडचणींमध्ये भर टाकली. यानंतर युवा कॅमरुन ग्रीनही फारशी चमक दाखवू शकला नाही. यादरम्यान सामन्यावर भारताचं वर्चस्व होतं. परंतू ग्लेन मॅक्सवेलने आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी करत मैदानात चौफर फटकेबाजी केली. भारतीय गोलंदाजांची धुलाई करत मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाचं आव्हान कायम राखलं. ३८ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह मॅक्सवेलने ५९ धावा केल्यानंतर बुमराहने त्याचा त्रिफळा उडवला. यानंतर ४७ व्या षटकांत अबॉटला माघारी धाडत शार्दुलने भारताला आणखी एक यश मिळवून दिलं. यानंतर कांगारुंचे फलंदाज तग धरु शकले नाहीत. भारताकडून शार्दुल ठाकूरने ३, टी. नटराजन, जसप्रीत बुमराहने २ तर कुलदीप आणि जाडेजा यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

Previous Post

७ जिल्ह्यातील तलाठी भरतीचा मार्ग मोकळा

Next Post

‘एमडीएच’ मसालेचे मालक धर्मपाल गुलाटी यांचं निधन

Next Post
‘एमडीएच’ मसालेचे मालक धर्मपाल गुलाटी यांचं निधन

‘एमडीएच’ मसालेचे मालक धर्मपाल गुलाटी यांचं निधन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group