• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, August 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

कोणतेही सरकार आंदोलनांना घाबरत नाही, तर पडण्याला घाबरते – अण्णा हजारे

by Yes News Marathi
November 26, 2020
in मुख्य बातमी
0
कोणतेही सरकार आंदोलनांना घाबरत नाही, तर पडण्याला घाबरते – अण्णा हजारे
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : कोणतेही सरकार फक्त आंदोलनांना घाबरत नाही, तर पडण्याला घाबरते. आंदोलानांच्या माध्यमातून जनमताचा रेटा तयार केल्यास त्याला घाबरून सरकार जनतेच्या मागण्या मान्य करते. म्हणून आता लोकपालप्रमाणे ग्रामसभेला जादा अधिकार देणारा कायदा करून घेण्यासाठी देशातील जनतेने अशी देशव्यापी शक्ती निर्माण करावी,’ असं आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलं आहे.

संविधान दिनाच्या निमित्तानं हजारे यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. त्यामध्ये आतापर्यंतच्या आंदोलनाचा आढावा घेतला असून लोकशाही बळकट करण्यासाठी ग्रामसभेला जादा अधिकार देण्याची मागणी केली आहे. खऱ्या अर्थाने लोकशाही आणायची असेल तर सरकारला झुकविणारी शक्ती उभी करा, असं आवाहन त्यांनी यातून केलं आहे.

हजारे म्हणाले, ‘देशाला स्वातंत्र्य मिळून एवढी वर्षे झाली तरीही खऱ्या अर्थानं लोकशाही राज्य प्रस्थापित झालं नाही. आपल्या देशातील पक्ष आणि पार्टी पद्धतीमुळं राज्यकर्त्यांनी जनतेला खरी लोकशाही मिळू दिली नाही. देशात संसद, राज्यात विधानसभा तशी गावात ग्रामसभा आणि शहरात वॉर्डसभा अशी रचना करणारा कायदा करा, अशी आमची मागणी आहे. मात्र, पक्ष आणि पार्टीवर चालणाऱ्या आपल्या सरकारला लोकांना अधिकार देणारी अशी रचना नको आहे. त्यामुळं आतापर्यंत यासंबंधी कोणत्याच सरकारनं हालचाल केली नाही. सरकारी तिजोरी ही जनतेची आहे. त्यातील व्यवहार पारदर्शक पद्धतीनंच झाले पाहिजेत. गावातील सार्वजनिक संपत्तीचे गाव मालक आहे. ग्रामसभेच्या निर्णयाशिवाय त्यासंबंधी निर्णय होता कामा नयेत. जनता मालक आहे आणि सरकारमधील लोक सेवक आहेत तर या मागण्यांसाठी सरकारवर अहिंसेच्या माध्यमातून दबाव आणावा लागेल.’

Previous Post

पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघात ६ वर्षात आ.दत्तात्रय सावंत यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडवले – समाधान घाडगे

Next Post

पंढरपूरचे आ.भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक

Next Post
पंढरपूरचे आ.भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक

पंढरपूरचे आ.भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group