• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, January 24, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

भारतीय शिक्षणपद्धती संस्कृती व ज्ञानसंपन्न: डॉ. प्रशांत साठे

by Yes News Marathi
January 23, 2026
in इतर घडामोडी
0
भारतीय शिक्षणपद्धती संस्कृती व ज्ञानसंपन्न: डॉ. प्रशांत साठे
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर विद्यापीठात लाभसेटवार व्याख्यानमाला संपन्न

सोलापूर – भारतीय शिक्षणपद्धतीला हजारो वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेली असून बालवयापासून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, संस्कृती आणि ज्ञानाची बीजे रोवणारी आहे. कुटुंबवत्सल्यावर आधारित ही शिक्षणप्रणाली अनुभवातून शिकवण देणारी असून तिचा जगभर डंका आहे, असे प्रतिपादन बृहमहाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय, पुणे येथील प्राध्यापक डॉ. प्रशांत साठे यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात डॉ. अनंत व डॉ. लता चारिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित लाभसेटवार व्याख्यानमालेत ते बोलत होते. “शैक्षणिक धोरण आणि महाराष्ट्रातील सद्यस्थिती” हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिकशास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे होते. यावेळी ट्रस्टचे संस्थापक डॉ. अनंत लाभसेटवार व डॉ. लता लाभसेटवार यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत केले.

डॉ. साठे यांनी सांगितले की, भारतात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली असून त्याद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच रोजगाराभिमुख कौशल्ये व प्रात्यक्षिक ज्ञान प्राप्त होणार आहे. डिजिटल युगात ऑनलाइन संशोधन उपयुक्त असले तरी त्यावर अति अवलंबून राहणे टाळावे, असे त्यांनी स्पष्ट केले. भारतीय शिक्षणपद्धती ही अनुभवाधारित असून समाजोपयोगी संशोधनावर अधिक भर देण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. गौतम कांबळे म्हणाले की, केंद्र सरकारने आणलेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी स्वीकारली आहे. मात्र काही राज्यांमध्ये अद्याप या धोरणाबाबत पुरेशी माहिती नाही. एकसंध भारतासाठी संपूर्ण देशात नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

या कार्यक्रमास व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, डॉ. अनिल घनवट, डॉ. विकास कडू, तसेच दत्ता पुकाळे, ओम इंगळे यांच्यासह विद्यापीठातील प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केले, तर आभार डॉ. ज्ञानेश्वरी हजारे यांनी मानले.

Previous Post

जि. प. व पं. स. सार्वत्रिक निवडणूक–2026 अंतर्गत उमेदवारी अर्ज प्रक्रिया शांततेत पार पडली; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून दूरदृश्य प्रणाली द्वारे बैठक घेऊन काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश

Next Post

पहिल्या दिवस अखेर महाराष्ट्राच्या पहिल्या डावात नाबाद 47 धावा, त्रिपुराचा पहिला डाव 209 धावात संपुष्टात.

Next Post
पहिल्या दिवस अखेर महाराष्ट्राच्या पहिल्या डावात नाबाद 47 धावा, त्रिपुराचा पहिला डाव 209 धावात संपुष्टात.

पहिल्या दिवस अखेर महाराष्ट्राच्या पहिल्या डावात नाबाद 47 धावा, त्रिपुराचा पहिला डाव 209 धावात संपुष्टात.

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In