सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी व महापुराने सोलापुरातील शेतजमिनीचे अतोनात नुकसान झाले आहे.
खरडून गेलेल्या जमिनीच्या रकमेसाठी ही शेतकऱ्यांना अद्यापही प्रतीक्षाच करावी लागत असल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
रब्बी हंगाम बियाणे अनुदान वाटप अद्यापही सात लाख 40 हजार शेतकऱ्यांचे 720 कोटी पाच लाख रुपये झालेले नाही.
याशिवाय खरडून गेलेल्या जमिनीच्या 57 कोटी 59 लाख रुपयाला शासनाने मंजुरी दिली नाही, त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नैसर्गिक आपत्तीच्या या बाधित सात लाख 64 हजार शेतकऱ्यांना 867 कोटी 38 लाख रुपये मंजूर झाले आहेत. रब्बी हंगाम बियाणे खरेदीसाठी सात लाख 92 हजार शेतकऱ्यांना 652 कोटी सात लाख रुपये मंजूर झाले आहेत.
ही मंजूर झालेली रक्कम 19 ऑक्टोबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
मात्र मंजूर रक्कम संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही. ऑगस्ट महिन्यात मंजूर न झालेल्या अतिवृष्टीच्या 60 कोटींचेही वाटप पूर्ण झाले नसल्याने बळीराजा वैफल्यग्रस्त झाला आहे.

