प्रभू श्रीरामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त अयोध्या येथे एकूण 40 विविध ठिकाणी भंडाऱ्याचे आयोजन केले जाणार आहे. यासाठी संपूर्ण भारतातून अनेक संस्थांचे आवेदन ट्रस्ट कडे आले. सोलापुरातील सीए राजगोपाल मिणियार हे अयोध्येच्या सल्लागार समितीत आहेत . त्यांनी संकल्प करून आग्रहाने सोलापूर जिल्ह्यासाठी एक भंडारा आरक्षित केला. भंडारा समस्त हिंदू समाज ,सोलापूर जिल्हा तर्फे चालवणार आहे. हा भंडारा 20 जानेवारी पासून चालू होऊन 5 फेब्रुवारी पर्यंत सलग 45 दिवस चालणार आहे. हा भंडारा श्री नारायण आश्रम , परिक्रमा मार्ग ,नया घाट, अयोध्या या ठिकाणी चालणार आहे. प्रसादामध्ये पुरी, एक भाजी ,मसाला भात व एक मिष्ठान्न याचा समावेश असेल.यामध्ये दररोज अंदाजे 4000 तीर्थयात्री भोजन प्रसाद चा लाभ घेतील.
यासाठी सोलापुरातील अनेक दानशूर लोक पुढे आले व त्यांनी या भंडाऱ्यातील प्रसादाचे यजमानपद स्वीकारले व संपूर्ण 45 दिवसाचे यजमान निश्चित झालेले आहेत. यासाठी दररोज स्वयंपाक करण्यासाठी सोलापुरातील उद्योग वर्धिनीच्या मार्फत सौ चंद्रिकाबेन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 80 महिला या 20-20 महिलांच्या तुकडीमध्ये जाऊन हा प्रसाद बनवणार आहेत या महिलांना जाण्या-येण्याचा खर्च व दैनिक मानधन देखील दिले जाणार आहे.
तसेच तेथे स्वयंसेवक म्हणून अनेक हिंदू संघटनातील सभासद श्री रंगनाथ बंकापूर यांच्या मार्गदर्शनाखाली 15-15 च्या तुकडी मध्ये एकूण शंभर सभासद स्वखर्चाने येणार आहेत.
सर्व सोलापूरकरांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल सीए राजगोपाल मिणियार यांनी सगळ्यांचे आभार मानले आहेत. आपण या कालावधीत अयोध्येला आलात तर जरूर या भंडाऱ्यामध्ये प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.