मुंबई : पंतप्रधान देहूमध्ये संत तुकारामाच्या भेटीला आले आणि एकनाथाला घेऊन गेले असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राज्यातील राजकीय स्थितीवर बोलताना लगावला आहे. दरम्यान आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही महत्वाची भूमिका घेतली असं वाटत नसल्याचंही छगन भुजबळ म्हणाले आहेत. राजकीय पक्षाने नेहमीच निवडणुकीसाठी तयार राहिलं पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला.









