येस न्युज मराठी नेटवर्क : भारतरत्न आणि भारताच्या सूर सम्राज्ञी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं आज मुंबईमध्ये निधन झालं आहे. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण जगावर शोककळा पसरली आहे. आज रविवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. रातकीय, सामाजीक, सांस्कृतीक, संगीत क्षेत्रातून दु:ख व्यक्त केले जात आहे.
लतादीदी गॉड गिफ्टेड व्यक्तिमत्त्व होत्या, त्या जरी आज आपल्यात नसल्या तरी स्वरांच्या माध्यमातून त्या नेहमीच आपल्यात राहतील अशी भावनिक प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली आहे. लता मंगेशकर या गॉड गिफ्टेड व्यक्तिमत्त्व होत्या.लता मंगेशकर यांच्या निधनामुळे अवघ्या जगाला दुःख झालं आहे. त्या जरी आज आपल्यात नसल्या तरी त्यांच्या स्वरांच्या माध्यमातून त्या नेहमीच आपल्यासोबत राहतील अशी प्रतिक्रिया राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात दिली आहे.
गेल्या महिनाभरापासून मी त्यांच्या तब्बेतीची नियमित विचारपूस करत होतो. त्या कोरोना आजारातून बऱ्या झाल्या होत्या. मात्र ईतर आजारांमुळे त्यांची तब्येत खालावत गेल्यानं त्यांचं दुर्दैवाने निधन झालं आहे. त्यांना चिरशांती लाभो अशा शब्दांत टोपे यांनी लतादीदींना श्रद्धांजली अर्पण केली.