सोलापूर : महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या अंतर्गत असलेल्या असमन्वयामुळे शासनाकडून आलेला एकसष्ट कोटी रुपयांचा निधी परत गेला आहे. असा आरोप आज आनंद चंदनशिवे यांनी पत्रकार परिषदेत केला विशेष म्हणजे पालकमंत्री विजय देशमुख यांच्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली नाही ,तर शहर अध्यक्ष विक्रम देशमुख हे या प्रश्नी पक्षातील नगरसेवकां मधील समन्वय साधण्यात अपयशी ठरले असं म्हटलं आहे. अण्णाभाऊ साठे विकास निधीतून सुरवातीला 50 कोटी रुपये मंजूर झाले होते पण वेळेत महापालिकेत न प्रस्ताव दिला नाही यामुळे हा सर्व निधी इतर नगरपालिका साठी वर्ग झाला. सत्ताधारी भाजपचीच ही बेजबाबदार कृती आहे. असं चंदनशिवे म्हणाले.
मागील वर्षी चा निधी परत गेला यानंतर आम्ही पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासमोर आग्रही भूमिका घेतली त्यावेळी त्यांनी या वर्षीचा निधी तातडीने मंजूर केला आहे. हा निधी मिळवण्यासाठी ही सत्ताधाऱ्यांनी तत्परता दाखवायला पाहिजे होती ती दाखवली नाही. नगरोत्थान योजनेचे ही 11 कोटी रुपये वेळेत प्रस्ताव दाखल न झाल्याने परत गेले आहेत, असा दावाही आनंद चंदनशिवे यांनी केला.
सध्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे सर्वच पक्षाच्या सदस्यांचा काम करतात. आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. जेव्हा उजनीचा प्रश्न ऐरणीवर येईल तेव्हा त्या विषयावर बोलू सध्या त्यांचा शहराच्या विकास कामासाठी निधी देण्याचा मूड आहे आम्ही अधिकाधिक निधी आणणार आहोत.










