मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच संतापले आहेत. नाना पटोलेंची भूमिका ही महाविकास आघाडीला सुरुंग लावणारी आहे, अशा शब्दात अजित पवारांनी आपली नाराजी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली.
नाना पटोले यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांवर केला होता. त्यानंतर अजित पवारांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीला सुरुंग लावला जातो आहे , असे अजित पवार म्हणाले. नाना पटोले हे नेते किंवा मंत्री नाहीत, ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. नाना पटोलेंची भूमिका मविआला कमकुवत करण्याची आहे. मविआला अडचणीत आणणारी आहे, असे अजित पवारांचे म्हणणे आहे.नाना पटोलेंच्या या भूमिकेबाबत मविआचे नेते काँग्रेसच्या नेत्यांशी संवाद साधणार आहेत.