नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत नऊ हजारांनी घट झाली आहे. तब्बल 102 दिवसांनी नव्या कोरोनाग्रस्तांचे आकडे 40 हजारांच्या खाली आले आहेत. कालच्या दिवसात 37 हजार 566 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 907 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत पुन्हा घट झाल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. कोरोनाबळींचा आकडाही एक हजाराच्या खाली गेला आहे. तर कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.
24 तासातील आकडेवारी
देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात भारतात 37 हजार 566 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 907 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 56 हजार 994 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.