सोलापूर : आता कुठे कोरोना च्या निर्बंधातून सुटका होऊन जनजीवन पूर्वपदावर येत होते… गरिबांच्या पोटापाण्याची व्यवस्था होऊ लागली होती… पावसामुळे वातावरण जसे प्रफुल्लित झाले होते त्याप्रमाणे बाजारपेठांमध्ये आनंद फुलू लागला होता… मात्र या सर्वांवर आता विरजण पडणार आहे. कारण आजपासून संपूर्ण महाराष्ट्र सायंकाळी चार नंतर दररोज बंद राहणार आहे. कोरणा विषाणूचा डेल्टा परिवर्तनामुळे राज्य शासनाने राज्यभरातील सर्व दुकाने चार नंतर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार सोलापूर शहर जिल्ह्यातील हे आदेश काढण्यात आले आहे.
त्यामुळे आता दुकानांची -हॉटेलची तपासणी ..पोलिसांकडून होणारी वाहनांची तपासणी ..दंड आकारणे .. E पास काढणे या कटकटी पुन्हा सुरू झाल्या आहेत. आषाढी वारी. मराठा आंदोलनाची सुरू झालेली धग.. विविध सुरू असलेले ओबीसी समाजाची आंदोलने… पुढील महिन्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणूका तसेच काही दिवसावर येऊन ठेपला गणेशोत्सव या सर्वांवर भीती घालण्यासाठी राज्य शासनाने हे आदेश काढलेत का अशी शंका आता सर्वत्र उपस्थित होत आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांसह व्यापाऱ्यांना पहिले पाढे पंचावन्न म्हणत जुनेच आदेश नव्याने लागू होणार असल्यामुळे सर्व सरकारी यंत्रणांना सामोरे जावे लागणार आहे.