पंढरपूर : केंद्राच्या नव्या कृषी धोरणाचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. शेतकरी ते खरेदीदार यांच्यातील सौहार्दपू्र्ण व्यवहारामुळे शेत माल विक्रीला अधिक गती मिळाली आहे.पंढरपूर जवळच्या आढीव येथील शेतकरी व पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांच्या भगव्या डाळिंबाला थेट केरळातून मागणी मिळाली आहे. प्रति किलो ७० रुपये दराने२५ टन डाळिंबाची बांधावर बसून त्यांनी थेट पर राज्यात विक्री केली आहे.